बहुजननामा ऑनलाइन टीम – इंग्लंडचा कर्णधार जो रूटचे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध सीरीजमध्ये मागे पडल्यानंतर पुन्हा परतत मिळवलेला भारताचा विजयसाठी शानदार होता आणि विराट कोहलीच्या टीमला(England captain) त्याच्या भूमीत आव्हान देण्यासाठी आम्हाला सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल.
कर्णधार कोहलीच्या शिवाय अनेक जखमी खेळाडूंशिवाय खेळत असलेल्या भारताने निर्णायक चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला तीन विकेटने पराभूत करून चार मॅचची सीरीज 2-1 ने जिंकली, तर याच्या एक महिना अगोदर टीम अॅडलेडमध्ये आपल्या टेस्ट इतिहासातील 36 धावांच्या किमान स्कोअरवर पराभूत झाली होती.
रूटने म्हटले, ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत शानदार सीरीज होती, ज्यामध्ये काही शानदार क्रिकेट खेळले गेले. खेळाडूंनी ज्याप्रमाणे कामगिरी केली त्यामधून भारताने जोरदार संघर्ष, जिद्द, लवचिकता आणि आपल्या टीमची एकजुट दर्शवली.
इंग्लंडच्या कर्णधाराने म्हटले की, एक क्रिकेटप्रेमी म्हणून टेस्ट क्रिकेटकडे पहाता हा खेळ शानदार होता आणि जेव्हा आम्ही भारतात जाऊ तेव्हा तो दौरा आणखी रोमांचक असेल. इंग्लंडच्या भारत दौर्याची सुरूवात चार टेस्टच्या सीरीजने होईल, जी चेन्नईमध्ये पाच फेब्रुवारीपासून खेळली जाईल. यानंतर पाच टी-20 इंटरनॅशनल आणि वनडे इंटरनॅशनल मॅचेसची सीरीज होईल.
रूटने म्हटले, भारतीय टीममध्ये आत्मविश्वास असेल. त्यांची टीम खुप चांगली आहे आणि त्यांना माहित आहे की, स्थानिक स्थितीमध्ये सर्वश्रेष्ठ खेळाचे प्रदर्शन कसे केले जाते. आम्हाला आमची सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल, परंतु ही आमच्यासाठी रोमांचक सीरीज असेल.
रूटने म्हटले, आम्ही सीरीज जिंकण्याच्या जिद्दीने तिथे जाऊ, परंतु तिथे पोहचण्याच्या पूर्वी आम्हाला खुप मेहनत करावी लागेल.