बहुजननामा ऑनलाईन टीम : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच भाजपची आयटी सेल कामाला लागली होती. आयटी सेलच्या माध्यमातून फडणवीसांच्या 80 तासाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळचे कौतुक करण्यात आले. राज्यातील मोठमोठ्या प्रकल्पांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीचे सरकार गैरवापर करु नये यासाठी फडणवीसांनी तातडीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच या 80 तासाच्या काळात फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवला. राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले. यानंतर भाजपच्या आयटी सेलकडून फडणवीसांच्या शपथविधीचा एक भलामोठा मॅसेज व्हारयल करुन समर्थन करण्यात आले मात्र, आयटीसेलचा हा प्रचार भाजपवरच उलटल्याचे चित्र दिसत आहे.
राज्याच्या भल्यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे अभिनंदन असेही म्हटले होते. हे मेसेज सोशल मीडियावर फिरत असताना भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे देखील फडणवीसांनी निधी परत पाठविल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांकडून फडणवीसांवर टीका करण्यात आली. राज्यातील जनतेशी ही दगाबाजी असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. यामुळे राज्यात खळबळ निर्माण झाली. यावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यामुळे फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांच्या दाव्याने भाजपच्या अडचणी वाढवल्या असल्याचे चित्र आहे.
खासदार अनंतकुमार हेगडेंच्या सांगण्यावरुन जर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठीचे 40 हजार कोटी रुपये परत पाठवले असल्यास जनता ते कधीचं सहन करणार नाही. असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हाव लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. हा राज्यावरचा अन्याय असून ही आग देशभरात पसरेल आणि यावर कोणतही राज्य गप्प बसणार नाही असही नवाब मलिक म्हणाले. खासदाराच्या दाव्यानंतर खुद्द फडणवीसांना समोर यावे लागले. आपण निधी परत पाठविण्याचे काम केले असून या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी सांगितले. एकूणच फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांचे दावे भाजपवरच उलटल्याची चित्र आहे.
Visit : bahujannama.com