बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात बोगस बियाणे कंपन्या आणि सरकारच्या धोरणावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ’शेतकर्यांच्या संदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय? असा सवाल करीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला आहे.
अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी कडू यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान, ज्या शेतकर्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. जे पेरले ते उगावले नाही आणि हातात जी पिकं हातात आली, ती मेलेली होती, त्यामुळे राज्य सरकारमधील कृषी खाते हे झोपलेले आहे की का? असा सवाल उपस्थितीत करत बच्चू कडूंनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. जेव्हा बियाणे तयार होते तेव्हा त्यात काही बदल केले जातात की काय असा संशय आहे. सरकारच्या महाबीज कंपनीने 2 ते 3 हजार रुपयात बाजारातीलच निकृष्ट दर्जाचे बियाणे घेऊन शेतकर्यांना 8 हजार रुपये भावाने विकले असावे. हे ’गेल्या 50 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे बोगस बियाणे बनवणार्या कंपनीच्या मालकालाच चोपल पाहिजे’ असे म्हणत बच्चू कडूंनी कंपन्यांना सज्जड इशारा दिला.