नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला फायदा होणार आहे. रेल्वेला जर उशीर झाला तर रेल्वेकडून तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येईल. प्रवाशांना, 1 तास उशीर झाला तर 100 रुपये तर 2 तास उशीर झाला तर 250 रुपये मिळणार आहेत. IRCTC ने याबाबत निर्णय घेतला. लखनऊ ते दिल्ली दरम्यान तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळेल.
रेल्वेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विम्यासह रेल्वेला उशीर झाल्यास नुकसान भरपाई देण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. रेल्वेला 1 तास उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये तर 2 तास उशीर झाल्यास 250 रुपये नुकसान भरपाई मिळेल. तशी तरतूद करण्यात आली आहे. तेजस एक्सप्रेस खासगी कंपन्यांकडून चालवण्यात येणारी पहिली रेल्वे आहे, रेल्वे यानंतर अशाच खासगी रेल्वे चालवण्याच्या विचारात आहे. तेजसची संपूर्ण देखभाल IRCTC कडून करण्यात येते. तेजसमधून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
तेजस एक्सप्रेस नवी दिल्लीतून 3.35 वाजता सुटणार असून त्याच दिवशी ही रेल्वे 10.5 मिनिटांनी लखनऊला पोहचेल. ही रेल्वे आठवड्यात सहा दिवस चालवण्यात येईल. म्हणजेच मंगळवारी ही रेल्वे सेवा मिळणार नाही. नवी दिल्ली – लखनऊ या मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेचा शुभारंभ 4 ऑक्टोबरला होईल. यात विमानासारखी सुविधा देण्यात येईल. रेल्वेत ऑन बोर्ड वायफाय सेवा, आरामदायक सीट, मोबाइल चार्जिंग, वैयक्तिक रिडिंग लाइट्स, मोड्यूलर बायो-टॉयलेट,एलसीडी इन्टरटेनमेंट-कम इन्फोर्शन स्क्रीन आणि सेन्सर टेप फिटिंग या सेवा देण्यात आल्या आहेत. लवकरच अहमदाबाद ते मुंबईसाठी तेजस एक्सप्रेसची सेवा उपलब्ध होऊ शकते. तेजस मध्ये एकूण 758 प्रवासी प्रवास करू शकतात. या ट्रेनमध्ये एक एक्झिक्युटिव क्लास वातानुकूलित चेअर कार आहे. ज्यात 56 सीट असतील. तसेच या रेल्वेत 9 वातानुकूलित चेअर कार असणार असून यात प्रत्येकात 78 सीट असतील.
Visit : bahujannama.com