बहुजननामा ऑनलाईन टीम : भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. माहितीनुसार, रोज २ कोटींपेक्षा जास्त भारतीय रेल्वेने प्रवास करतात. त्यात रेल्वेच कॅन्सल झाली तर किंवा रेल्वेची तिकिटच कॅन्सल झाली तर खूप मोठी समस्या निर्माण होते, त्यामुळे या समस्येवर तोडगा म्हणून IRCTC ने नवीन नियम लागू केले आहे. रेल्वे तिकीट कॅन्सल करण्याच्या त्याच रिफंड करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण होतात. तिकीट रद्द करणे या गोष्टीवर निर्भर असते कि तुमचे तिकीट कोणत्या क्लासचे आहे तसेच रेल्वे सुटण्याच्या किती वेळ आधी ते कॅन्सल होत आहे. तरी रेल्वे संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकता.
त्यामुळे जाणून घेऊ ह्या नवीन नियमांसंदर्भात :
जर तुम्ही तिकीट रेल्वे निघायच्या ४८ तासांपूर्वी केले असेल, तर AC फर्स्ट क्लास च्या तिकिटावर तुम्हाला २४० रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच AC २ टायरसाठी हे शुल्क २०० रुपये असेल, AC ३ टायर साठी १८० रुपये आकारले जातील. तसेच स्लीपर कोचसाठी १२० रुपये तर सेकंड क्लाससाठी ६० रुपये रद्दीकरण शुल्क मोजावे लागतील.
जर तुम्ही तिकीट रेल्वे निघायच्या १२ तास आधी रद्द केले असेल, तर तुम्हाला तिकीटाची २५ टक्के रक्कम शुल्क म्हणून मोजावी लागेलं. मात्र या मध्ये एक आहे कि, जे शुल्क जास्त आहे, ते आधी द्यावी लागेल.
रेल्वे निघायच्या १२ ते ४ तास आधी तुम्ही तिकीट रद्द करत असाल, तर तुम्हाला तिकिटाच्या ५० टक्के रक्कम शुल्क म्हणून भरावी लागेल. मात्र तुम्ही ४ तास आधी तिकीट रद्द करत असला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम परत मिळणार नाही.
आरएसी तिकीट जर तुम्ही रेल्वे निघायच्या अर्धा तास आधी रद्द करत असाल तर तुम्हाला शुल्क कापून उर्वरित रक्कम दिली जाते. या संदर्भातील संपूर्ण माहिती रेल्वेच्या ऍपवर उपलब्ध आहे.
जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले असेल तर, आणि तुम्हाला ते रद्द करायचे असेल, तर तुम्हाला TDR अर्थात तिकीट डिपॉजिट रिसिप्ट जमा करण्याची गरज पडत नाही. उर्वरित रक्कम आपोआप तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
तसेच जर रेल्वे ठरलेल्या वेळेच्या ३ तास उशिरा आली, आणि तुम्हला त्या वेळेत जायचे नसेल तर तुम्हाला तिकिटाचे संपूर्ण पैसे परत मिळतील.
जर तुमच्याकडे वेटिंगवाले इ- तिकीट असेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. ते विना तिकीट प्रवासात मानण्यात येईल.
जर तुम्ही तात्काळ तिकीट काढले असेल आणि रेल्वे ३ तास उशिरा असेल आणि तुम्हाला प्रवास करायचा नसेल तर तुम्हाला तिकीटाची पावती जमा करणे आवश्यक आहे. तसेच रेल्वे रद्द झाल्यास पैसे परत मिळण्यासाठी पावती आणि पैसे जमा केल्याची पावती आवश्यक आहे.
Visit : bahujannama.com