बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आलेले आहेत. मात्र, तरीही देशतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. त्यामुळे आयआरसीटीसीने आपल्या खासगी रेल्वेचे बुकींग 30 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) has decided to suspend bookings for trains that are run by it, till 30th April. IRCTC runs three trains as of now, 2 Tejas trains and 1 Kashi Mahakal Express: IRCTC Spokesperson pic.twitter.com/7IC2LJekws
— ANI (@ANI) April 7, 2020
आयआरसीटीसीकडून तीन खासगी रेल्वे चालवल्या जातात. ज्यामध्ये दोन तेजस ट्रेन आणि एक काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. या तिन्ही रेल्वेंचे बुकींग केलेल्या सर्व प्रवाशांना त्यांचे संपूर्ण पैसे रिफंडद्वारे मिळणार आहेत. लॉकडाउनमुळे या तिन्ही रेल्वेंचे 25 मार्च ते 15 एप्रिलपर्यंतचे सर्व बुकींग बंद करण्यात आले होते. मात्र आयआरसीटीसीकडून आता 30 एप्रिल पर्यंत सर्व बुकींग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पुर्वी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 31 मार्चऐवजी 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले होते. ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असतील त्यांनी चुकूनही तिकीट रद्द करु नये असे आवाहनही आयआरसीटीसीकडून प्रवाशांना करण्यात आले होते. 14 एप्रिलपर्यंत रद्द झालेल्या रेल्वेसांठी ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असेल त्यांनी ते तिकीट रद्द करु नये, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.