नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPCC Report | नागरिकांना वेळोवेळी सूचना करणारे आपले वैज्ञानिक (Scientist) हे जागतिक तापमानवाढीविषयी वारंवार माहिती देत असतात. दरम्यान हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेलच्या (IPCC Report) एका नव्या रिपोर्टनुसार इसवी सन 2100 पर्यंत अर्थात अवघ्या 79 वर्षात जगाच्या तापमानामध्ये 4.4 डिग्री (World temperature) सेल्सिअसने वाढ होईल. यावरून दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरील बर्फ वितळून जगातील अनेक ठिकाणची जमीन पाण्याखाली जाईल. यात भारतातील समुद्रकिनाऱ्यावरअसणारी 12 शहरे ही सुमारे 3 फूट पाण्याखाली जातील असं या रिपोर्टनुसार (Report) सांगितलं आहे.
तर, अमेरिकीच्या नासाने (NASA) IPCC च्या रिपोर्टमधून (Report) मिळालेल्या माहिती आधारे
एक सी लेव्हल प्रोजेक्शन टूल (Sea level projection tool) तयार केले आहे.
यामध्ये जगाचा नकाशा दिला आहे, ज्यात दाखवलं आहे की, कोणत्या वर्षी जगातील कोणत्या भागातील समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल.
यामध्ये आता देशात कोची, गोव्यातला मारमुगाव किनारा, भावनगर, मुंबई, ओखा, तुतीकोरीन,
पारादीप, मँगलोर, चेन्नई आणि विशाखापट्टणम या शहरांना आगामी काही वर्षात धोका असल्याची शक्यता समोर येत आहे.
या शहरात पाणी पातळी ही आगामी 10 वर्षात 2 ते 7 इंचांनी, तर आगामी 80 वर्षात सुमारे 3 फुटांनी वाढणार आहे. असा IPCC चा अहवाल सांगत आहे.
https://twitter.com/NASA/
1850 नंतर 4 दशकात जेवढी तापमानवाढ झाली नव्हती, त्याहून जास्त तापमानवाढ मागील 4 दशकात झालीय.
याआधी जी उष्णतेची लाट (Extreme Heatwave) दर 50 वर्षांनी येत होती, ती आता दर 10 वर्षांनी येत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरवर्षी जगात सुमारे 4 कोटी टन कार्बन डायऑक्साईडचे (Carbon dioxide) उत्सर्जन होते.
हे थांबले नाही, तर आगामी 2 दशकात जगाचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढेल असा इशारा IPCC ने दिलाय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान या अहवालाचे (Report) प्रमुख लेखक आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील
(Oxford University) संशोधक फ्रेडरिको ओट्टो (Frederico Otto) यांनी माहिती दिली आहे की, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, टर्की अथवा कॅनडा या देशातील जंगलांना आग लागण्याच्या घटनाही जागतिक
तापमान वाढीमुळेच होत आहेत.
एकीकडे जंगले जळून खाक होतायत, तर दुसरीकडे समुद्राची पातळी (Sea level increasing)
वाढते. यामुळे काहीशे वर्षात कित्येक देशांचा बराचसा भाग पाण्याखाली गेलेला असेल, तर बाकी भागात झाडंच नसल्यामुळे राहण्यास अडचण येईल.
म्हणून 2050 पर्यंत प्रदूषणावर आवर घालून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे 500 कोटी टनपर्यंत खाली आणणं महत्वाचं आहे.
नाहीतर आपणच करत असलेले प्रदूषण आपल्यासाठी आणि पृथ्वीवरील अन्य जीवांसाठी घातक ठरणार असल्याचं सांगितलं आहे.
Web Title : IPCC Report | 12 indian cities will be under water sea level rise danger world ipcc report.
Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर