नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh)अधिकारी आणि नेत्यांवर जागतिक दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणांनी याचा खुलासा केला आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या (Intelligence Bureau) म्हणण्यानुसार, दहशतवादी आपल्या योजना पूर्णत्वास आणण्यासाठी वाहनांच्या माध्यमातून आयईडी (IED) आणि व्हीबीआयईडी(VBIED) चा वापर करू शकतात.हे हल्ले महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानसारख्या राज्यात होऊ शकतात, असा दावा इंटेलिजन्स ब्युरोने केला आहे.
दहशतवादी या ठिकाणी हल्ला करू शकतात
एएनआयच्या अहवालानुसार, या महिन्यात उघड झालेल्या या नव्या इनपुटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की येत्या काही दिवसांत जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंधित अज्ञात व्यक्ती आयईडीच्या माध्यमातून आरएसएसच्या अधिकाऱ्यांवर / नेत्यांवर आणि पोलिस ठाण्यांवर हल्ला करू शकतात.
या सूचनेनुसार सर्व राज्यातील सुरक्षेची व्यवस्था चोख करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, आसाम आणि उत्तर प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवली जात आहे.
RSSच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्येची बातमी उघडकीस
अलिकडे आरएसएसच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या महिन्यात सीएएच्या समर्थनार्थ रॅलीत सहभागी झालेल्या आरएसएस कार्यकर्त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बंगळुरू पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. वरुण बोपालावर चालून अनेक वार करण्यात आले होते त्यात ते बालंबाल बचावले गेले होते. मोहम्मद इरफान, सय्यद अकबर, सय्यद सिद्दीक अकबर, अकबर बाशा, सनाउल्ला शरीफ आणि सादिक उल अमीन असे आरोपींची नावे आहेत. ते सर्वजण मोठी घटना घडविण्याचा प्रयत्न करीत होते असा पोलिसांचा दावा आहे.