मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इंदू मील येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम जोमात सुरु आहे. या कामातील अडथळे आता शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे स्मारकाचं काम २०२० च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पुर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
✅Work for Dr Babasaheb Ambedkar Memorial at Indu Mill is also going on in full swing.
Now, not even a single hurdle left in this.
We expect this work to be completed by 2020 #MahaParinirvanDin : CM @Dev_Fadnavis in Assembly #MonsoonSession— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2019
इंदू मील येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणीसाठी आवश्यक त्या परवानग्या शासनाने घेतल्या आहेत. त्यानंतर हे स्मारक १४ एप्रिल २०२० पर्यंत पुर्ण करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. स्मारकाचे काम दृश्य स्वरुपात २०१९ पर्यंत दिसेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
इंदू मील स्मारकाचे काम मुंबईतील ख्यातनाम बांधकाम कंपनी शापुर्जी पालनजीला देण्यात आले आहे. या कंपनीची ७०९ कोटी रुपयांची निविदा मंजूर करून राज्य सरकारने येत्या ३ वर्षांमध्ये स्मारक उभे करण्यात येणार आहे.
त्यानंतर आज विधीमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. इंदू मील संदर्भातील सर्व अडथळे आता शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे स्मारकाचे काम येत्या २०२० च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पुर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.