बहुजननामा ऑनलाईन – करोनाचा फटका भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौऱ्याला बसला असून उर्वरित दोन्ही सामने रद्द करण्याची वेळ बीसीसीआय वर आली आहे.
पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर १५ मार्च रोजी लखनऊ आणि १८ मार्च रोजी कोलकत्ता येथील सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय बीसीसीआय ने घेतला होता. मात्र पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारच्या सामन्यासाठी भारतीय संघ देखील लखनऊ मध्ये दाखल झाला होता. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हे सामने रद्द केल्याचे बीसीसीआयच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.