बहुजननामा ऑनलाईन – शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तान आणि चीन हे तोंडघशी पडले. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य करण्याच्या भारतीय प्रयत्नांची उलट UNSC ने प्रशंसा केली. UNSC मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी आपला हजरजबाबीपणा, तथ्यांची मांडणी आणि कुटनितीने दिलेल्या उत्तरांनी पाकिस्तानी पत्रकारांना निरुत्तर केले.
या बैठकीत चीनने लाख प्रयत्न करूनही कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या अनेक पत्रकारांनी अकबरुद्दीन यांना सातत्याने काश्मीर आणि मानवाधिकारावर प्रश्न विचारले. कलम ३७० वरही त्यांनी भारताला प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण अकबरुद्दीन यांनी पत्येक प्रश्नाला नेमके आणि मुद्देसूद उत्तर दिले.
या पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने अकबरुद्दीन यांना विचारले की, नवी दिल्ली इस्लामाबादशी कधी चर्चा करणार ? यावर अकबरुद्दीन पुढे येत आत्मविश्वासाने म्हणाले, ‘याची सुरुवात आतच करू असे ,म्हणत त्यांनी एकेक करून तिन्ही पाकिस्तानी पत्रकारांशी हस्तांदोलन केले. आणि पुढे म्हणाले, मैत्रीचा हात पुढे करून आम्ही दाखवलं की आम्ही शिमला करारासाठी प्रतिबद्ध आहोत. आता पाकिस्तानकडून उत्तराची वाट पाहत आहोत.’