सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – धर्माच्या नावावर अंधश्रद्धा पसरविली जात असल्याने धर्माकडे बघण्याची नजर तपासली पाहिजे, असे मत 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.
दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचे नुकसान होत आहे, व दलित साहित्य मी मनात नाही, त्याच्या ह्या वक्त्यावर दलित चळवळीमधून त्यांच्यावर टीका होत आहे. नेत्यानी बाबासाहेबाला अपेक्षित असलेली चळवळ पुढे नेली नाही असे देखील म्हणले. प्रकाश आंबेडकर हे काही बाबासाहेबांच्या विचारांचे वारस नाहीत हे त्यांच्या एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातील भूमिकेमुळे दिसून येते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर महानगर तर्फे फडकुले सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गज्वी यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आम्ही नाटककार कलेची सेवा करत नसून समाजाला पडलेले प्रश्न समाजासमोर नाटक रूपातून ठेवतो. मराठी रंगभूमीवर अलीकडे राजकीय नाटके फारशी होत नाहीत. आमचे लेखक अलीकडे खुजे झाले आहेत. राजकारण समजून घेण्याची त्यांची पात्रता नाही, म्हणून नाटके होत नाहीत. खरे तर राजकीय पुढाऱ्यांच्या एकेका वाक्यावर संपूर्ण नाटक लिहिले जाऊ शकते. परंतु तसे होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.