नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांग्लादेशातील कथित गुन्हेगारांच्या एक गटाने बुधवारी बीएसएफ सीमा चौकीवर हल्ला केला. त्यांनी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्यारे हिसकावून घेतली असून या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेसंदर्भात पश्चिम जैनतिया हिल्सचे पोलिस अधीक्षक लकादर सियेम यांनी सांगितले की, मध्यरात्री अमदोह आणि रोंगतीला येथे ही घटना घडली. रोंगतीला सीमा चौकीजवळ १०-१५ बांग्लादेशी नागरिकांच्या पथकाने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन जवानांना घेराव घालून शस्त्रे हिसकावली आणि त्यातील एकाला जखमी केले.
भारत-बांग्लादेश सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर हि घटना आहे. शेजारील देशातील आणखी एक गट मेघालयातील एका व्यक्तीच्या घरात घुसला, तो पैसा, मोबाइल फोन आणि बंदूक लुटून फरार झाला. त्याचवेळी या अपघातात घराचा प्रमुख जखमी झाला.
बीएसएफच्या जवानांकडून घेतलेली शस्त्रे जवळच्या जंगलात सापडली. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडली असल्याचे एसपी यांनी सांगितले. बीएसएफ जवानांना दौकी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. मेघालयचे शिक्षणमंत्री लंखमेन रेंबूई यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.