बहुजननामा ऑनलाईन- भारतामध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ला करण्यााठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती मिळाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम (बीएटी) ने जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळला आणि चार ते पाच दहशतवाद्यांना ठार केले. या घटनेचा व्हिडीओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे.
अलीकडेच, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या बीएटीने केरन आणि मछिल क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्नही उधळून लावला. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या वाढत्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारतीय सैन्य देखील हाय अलर्टवर आहे.
#WATCH: Indian Army foiled an infiltration attempt by a Pakistani BAT(Border Action Team) squad along the Line of Control in Keran Sector of Kupwara in the 1st week of Aug. Bodies of eliminated Pakistani Army regulars/terrorists along with equipment seen in video.#JammuAndKashmir pic.twitter.com/kXKsJskVs0
— ANI (@ANI) September 9, 2019