मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरच्या हाजीपूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिक मारले. १० सप्टेंबर रोजी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, त्यानंतर भारताने त्याला प्रतिउत्तर देत दोन पाकिस्तानी ठार मारले. यानंतर, पाकिस्तानी सैनिकांनी पांढरा झेंडा आणला आणि आपल्या ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह परत नेले. ही पूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की एखादी व्यक्ती पांढरा झेंडा घेऊन मृतदेहांची छाननी करून जात.
त्यानंतर ते दोघे मृतदेह घेऊन सीमेच्या पलीकडे जातात. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ १० किंवा ११ सेप्टेंबरच आहे. या वर्षी पाकिस्तानने तब्बल १८८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या वर्षीच्या मानाने हा आकडा खूप जास्त आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानने १६२९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. अनेकदा तर भारताने दिलेल्या जोरदार प्रतिउत्तरामुळे पाकिस्तानने स्वतः शस्त्रसंधी पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे.
#WATCH Hajipur Sector: Indian Army killed two Pakistani soldiers in retaliation to unprovoked ceasefire violation by Pakistan. Pakistani soldiers retrieved the bodies of their killed personnel after showing white flag. (10.9.19/11.9.19) pic.twitter.com/1AOnGalNkO
— ANI (@ANI) September 14, 2019
ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानकडून तब्बल २७१ वेळा गोळीबार करण्यात आला आहे आणि पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आर्टिलरी तोफांचा सुद्धा वापर केला होता.ज्यावरून स्पष्ट झाले की पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता.