काश्मीर : वृत्तसंस्था – भारतीय लष्करारकडून आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरी करणार्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत केली जात असल्याचं वेळावेळी स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं मोहिम उघडली असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्दवस्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, लष्करानं केलेल्या कारवाईमध्ये 11 पाकिस्तानी सैनिकांसह तब्बल 22 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निलम व्हॅलीमध्ये पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय असून त्यावर देखील भारतीय लष्करानं हल्ला केला आहे. दहशतवाद्यांचे 7 तळ उध्दवस्त करण्यात आले आहेत. उखळी तोफांचा वापर लष्कराकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.
Indian army has used artillery guns to target the terrorist camps which have been actively trying to push terrorists into Indian territory. https://t.co/MHfOLqbYUr
— ANI (@ANI) October 20, 2019
त्यामध्ये 2 भारतीय जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करारकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिकांसह 22 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, अद्याप त्याला संरक्षण मंत्रालयाकडून दुजोरा मिळालेला नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 5 दशहतवाद्यांचा भारतीय लष्कराकडून खात्मा करण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com