बहुजननामा ऑनलाईन – टी – २० बरोबरच एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. २ – ० ने एकदिवसीय मालिकेत बाजी मारली. आणि आता आपणच बेस्ट आहे हे भारतीय संघाने सिद्ध केले. दुसरीकडे मात्र बीसीसीआयच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताची कसोटी मालिका बाकी आहे पण याआधीच भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना या दौऱ्यावरून पुन्हा मायदेशी बोलवण्यात आले आहे. मायदेशी परतल्यानंतर त्यांना बीसीसीसीआयसमोर हजर राहून त्यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार होते. पण आता बीसीसीसीआयने आपल्या निर्णयावरून यु- टर्न घेत सुब्रमण्यम यांनी माफी मागितल्याने त्यांना एक संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांना आता विंडीजच्या दौऱ्यात संघाबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
याआधीही वर्ल्ड कपनंतरही बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना फैलावर घेतले होते. खेळाडू नियमांचे उल्लंघन करत असताना व्यवस्थापकांनी आक्षेप का नाही घेतला ? त्यांना फक्त संघाच्या सरावाकडे लक्ष देण्यासाठी पाठवले नव्हते, असेही बीसीसीआय कडून सांगण्यात आले होते.