पुणे : बहुजननामा ऑनलाईन : भारत आणि इंग्लंडच्या टीम चेन्नईतून अहमदाबादमध्ये पोहचल्या आहेत, येथे दोन्ही टीममध्ये तिसरी आणि चौथी टेस्ट मॅच खेळली जाईल. दोन्ही टीम यानंतर टी20 आणि वनडे सीरीज खेळतील. सध्या शेड्यूलनुसार, इंग्लंडची टीम भारत दौर्यावर आपली शेवटची मॅच पुण्यात खेळणार आहे. परंतु आता या शेड्यूलमध्ये बदलाचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघाने गुरुवारी म्हटले की, भारत आणि इंग्लंडमध्ये पुण्यात होणारी शेवटची वन-डे मुंबईत शिफ्ट केली जाऊ शकते. ही मॅच 28 मार्चला खेळवली जाणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघाने म्हटले की, भारत आणि इंग्लंड सीरीजबाबत बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) सोबत काही चर्चा सुरू आहे, जेणेकरून पाहुण्या संघाला प्रस्थानासाठी सोयीची व्यवस्था उपलब्ध करून देता येईल. क्रिकेट संस्थेने गुरुवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की, एक मॅच (28 मार्चला होणारी अंतिम मॅच) कदाचित मुंबईत शिफ्ट केली जाऊ शकते. जेणेकरून पाहुण्या टीमला मुंबईहून ब्रिटनला प्रस्थान करण्यासाठी सोयीची व्यवस्था उपलब्ध केली जाऊ शकते. याबाबत अंतिम निर्णयाची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, संघाचे अध्यक्ष विकास ककाटकर यांनी म्हटले की, एमसीए मार्चमध्ये भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान होणार्या तीन वनडे अंतरराष्ट्रीय मॅचेसच्या आयोजनासाठी तयार आहे. या मॅच 23 मार्च, 26 मार्च आणि 28 मार्चला पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियममध्ये खेळवल्या जाणार आहेत. भारत आणि इंंग्लंडच्या टीम सध्या टेस्ट सीरीजमध्ये 1-1 च्या बरोबरीत आहेत. इंग्लंड ने भारताला पहिल्या टेस्टमध्ये 227 धावांनी पराभूत केले होते. भारताने दूसरी टेस्ट 317 धावांनी विजय मिळवला तसेच सीरीजमध्ये बरोबरी केली आणि पराभवाचा बदला सुद्धा घेतला.