नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने रविवारी संध्याकाळी आंध्रप्रदेशच्या किनार्यावरून K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे असे क्षेपणास्त्र आहे जे देशाच्या शत्रूला क्षणार्धात उद्ध्वस्त करू शकते. काही मिनिटात पाकिस्तान आणि चीनमधील शहरांंची राख करण्याची ताकद असणार्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे K-4 SLBM हे एक सबमरीन लॉन्च बॅलेस्टिक मिसाइल आहे. म्हणजेच हे खोल समुद्रातील पाणबुडीवरून सोडले जाऊ शकणारे क्षेपणास्त्र आहे.
K-4 क्षेपणास्त्राला प्रथम स्वदेशी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतवर लॉन्च करण्यात आले. K-4 चे नाव भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉक्टर ए .पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. येथे के चा अर्थ कलाम असा आहे. K-4 ची निर्मिती डीआरडीओने ज्या प्रकल्पांतर्गत केली आहे त्याचे नाव ब्लॅक प्रोजेक्ट आहे. हे नाव यामध्ये बाळगल्या जात असलेल्या गोपनीयतेमुळे देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार K-4 ची चाचणी विशाखापट्टणमवरून 45 नॉटिकल मैल दूर एका अज्ञात स्थळी करण्यात आली. ज्या अरिहंत पाणबुडीवरून K-4 लॉन्च करण्यात आले ती भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे.
डीआरडीओच्या टॉप सीक्रेट कार्यक्रमात तयार करण्यात येत असलेले K-4, एक कमी वजनाचे, वेगवान आणि सहजपणे रडारवर न येणारे क्षेपणास्त्र आहे. K-4 क्षेपणास्त्राची खासियत म्हणजे त्याची बूस्ट गाइड फ्लाइट सिस्टम आहे, या द्वारे कोणत्याही अँटी-बॅलेस्टिक मिसाइल सिस्टमला चकवा देता येईल. K-4, अग्नि-3 क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने लहान आहे, यामुळे हे सहजपणे अरिहंतसारख्या आण्विक पाणबुडीमध्ये लावले जाऊ शकते. वेड्या-वाकड्या मार्गानेही जाऊ शकणारे हे क्षेपणास्त्र रडारवर येऊ शकत नाही. तसेच शत्रूच्या ठिकाणांवर झीरो एरर म्हणजेच एकही चूक न करता हल्ला करू शकते. K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पहिल्यांदा 2014 मध्ये समुद्राच्या 30 फुट खाली एका नकली पाणबुडीवरून टेस्ट फायर करण्यात आले होते.
Visit : bahujannama.com