नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सोमवारी कोरोनाची 3 लाख 55 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. एक मे च्या तुलनेत मागील 3 दिवसांपासून नवीन प्रकरणे कमी होत असली तरी आता देशाने आणखी एक अवांछित विक्रम केला आहे. भारतात कोरोनाने संक्रमित एकुण लोकांची संख्या दोन कोटीच्या पुढे गेली आहे. भारत आता जगातील दुसरा देश आहे जिथे कोरोनाचे एकुण रूग्ण 2 कोटीपेक्षा जास्त झाले आहेत. संसर्गाचा वेग इतका जास्त आहे की, अवघ्या 137 दिवसात प्रकरणे एक कोटीवरून 2 कोटीच्या पुढे गेली आहेत. यापूर्वी संक्रमितांची संख्या एक लाखावरून एक कोटीपर्यंत पोहचण्यासाठी 360 दिवस लागले होते. म्हणजे चार महिन्यात कोरोनाची प्रकरणे दुप्पट झाली.
एका दिवसात 3400 पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू
देशात सोमवारी कोरोनाची 3,55,828 नवी प्रकरणे आली तसेच आणखी 3438 रूग्णांचा मृत्यू झाला. संक्रमितांची एकुण संख्या 2 कोटी 2 लाख 75 हजार 543 वर पोहचली आहे, जी संसर्गाच्या एकुण प्रकरणांच्या 17.13 टक्के आहे. तर मृतांची संख्या 2 लाख 22 हजार 666 झाली आहे. देशात 01 मे रोजी संसर्गाची विक्रमी 4,01,993 नवीन प्रकरणे आली होती, तर दोन मे रोजी 3,92,488 प्रकरणे समोर आली. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या वाढून 34,44,548 झाली आहे.
दिल्लीमध्ये विक्रमी मृत्यू
राजधानी दिल्लीत सोमवारी विक्रमी 448 लोकांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाली. मृतांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे.
आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, चिंतेची बाब आहे की, 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणात अजूनही वाढ होत आहे. त्यांनी म्हटले की, 12 राज्यांमध्ये सक्रिय रूग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. तर सात राज्यात 50 हजार ते एक लाखाच्या दरम्यान आहे.
भारत जगातील तिसरा देश
कोरोना व्हायरसने होणार्या सर्वात जास्त मृत्यूंच्या प्रकरणात भारत जगात तिसर्या स्थानावर पोहचला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सर्वात जास्त 5.92 लाख, ब्राझीलमध्ये 4.04 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर भारत आहे, जिथे कोरोना व्हायरसने आतापर्यत 2.18 लाख लोकांचा बळी घेतला आहे.