बहुजननामा ऑनलाइन टीम : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारवरुन सत्तेसमोर सर्वकाही शून्य असं समिकरणच स्पष्ट झाले आहे. भाजप सत्तेमध्ये येण्याच्या आशेने अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर अनेक नेते छुप्या पाठिंब्यानंतर अपक्ष निवडूनही आले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या अपक्षांना सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले सजंयमामा शिंदे यांनी भाजप सत्तास्थापन हे दिसताच आपला पाठिंबा जाहीर करुन टाकला होता. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, संजयमामा यांनी निर्णय बदलत राष्ट्रवादीला पाठींबा दर्शविला. मतदार संघातील कामे करायची असेल तर सत्तेसोबत जाणे आवश्यक आहे. या विचाराने भाजपसोबत गेलेले आमदार महाविकास आघाडिकडे वळण्याची शक्यता आहे.
यांच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बहुमताच्या वेळी राजेंद्र राऊत हे गैरहजर होते. त्यामुळे ते भाजपमध्येच जाणार हे स्पष्ट झाले होते. पण पाच वर्षे विरोधात बसावे लागणार आणि त्यामुळे मतदार संघातील कामे होणार नाही. याच उद्देशाने राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदेही असल्याचे सांगण्यात जाते. दोन वर्षापुर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन विजय मिळवला. आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चिन्हे आहे.
Visit : bahujannama.com