नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून नाव कमावणाऱ्या दहा महिलांच्या नावाने विद्यापीठांमध्ये दहा स्वतंत्र पीठं स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. या महिलांची नावे दहा विभागांना युजीसीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
ज्या महिलांनी कला, साहित्य, विज्ञान, आरोग्य, वन, संरक्षण, गणित, कविता लेखन आणि शिक्षा या क्षेत्रात बदल करण्याचे काम केले आहे, त्या अहिल्याबाई होळकर, महादेवी वर्मा, राणी गैदीनलियू, आनंदीबाई गोपाळराव जोशी, एम.एस. सुब्बुलक्ष्मी, अमृता देवी बेनीवाल, लीलावती, कमला साहोने, लालदेद, हंस मेहता यांची नावे देण्यात येणार आहेत.
शैक्षणिक सत्र २०२० पासून विद्यापीठांमध्ये अभ्यास आणि संशोधन सुरू केले जाणार असून याच महिला विद्वानांच्या नावावर असलेल्या या खंडपीठाचे कार्य महिलांना उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, अभ्यास आणि संशोधनासाठी प्रेरित करणे आहे. यासाठी युजीसीने वेगळा ५ कोटी रु. खर्च प्रति वर्ष करण्याची तयारी दाखवली असून यामध्ये शिक्षकांची नियुक्ती, संशोधन आणि अभ्यासाचा खर्च समाविष्ट केलेला आहे. सुरुवातीला याची स्थापना पाच वर्षांसाठी करण्यात आली असून त्यानंतर युजीसी याबाबतचे आकलन करणार आहे.
Visit : bahujannama.com