बहुजननामा ऑनलाईन – आज संपूर्ण भारतात ७३ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा केला जातो आहे. मागच्या आठवड्यात मोदी सरकारने घेतलेल्या जम्मू काश्मीर संबंधित ३७० कलम रद्द करण्याच्या घोषणेनंतर मोदी सरकारने ‘चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी’ (CDS) हे पद देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावर भाषण करतांना काही महत्वपूर्ण घोषणा केली.
PM Modi: Our security forces are our pride. To further enhance coordination between our forces, I announce a big decision today,India will now have a Chief of Defence Staff- CDS. This is going to make the forces even more strong pic.twitter.com/sLH3wnuyrp
— ANI (@ANI) August 15, 2019
नुकतीच मोदी सरकारने चीफ डिफेन्स सिक्युरिटी या पदाची घोषणा केली आहे. हे पद भूषविणारे अधिकारी देशाच्या तिन्ही सैना दलाचे नेतृत्व करणार आहेत. ही प्रभारी व्यक्ती तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुख पदी असणार आहे. भारताच्या इतिहासात हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. तिन्ही सैना दलात ताळमेळ राखण्याची भूमिका या पदावरील व्यक्ती निभावेल. मोदींनी भाषण करतांना सांगितले की, यापुढे तिन्ही दलाच्या सैन्याला एक साथ चालावे लागेल.
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढा
आम्ही महागाई नियंत्रणात आणली, तसेच विकास दर देखील स्थिर ठेवला आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढा देत आहोत. संपत्ती निर्मिती देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. शिवाय संपत्ती निर्मिती करणारे देखील या देशाची संपत्ती आहेत असे देखील पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावरील आपल्या भाषणात सांगितले.