बहुजननामा ऑनलाइन टीम – स्वामी वावेकानंदाना ३९ वर्षाचे आयुष्य लाभले, तर छत्रपती शिवाजी महाराजांना ५० वर्षाचे आयुष्य लाभले.आयुष्यात कोण किती वर्षे जगला त्याच्यावर इतिहास अवलंबुन नसतो.तर त्याने जगताना स्वत: व इतरांना(Harshvardhan Patil) कशा पद्धतीने जगविले तो काळ महत्वाचा असतो. यासाठी प्रत्येकाने स्वामी विवेकानंद वाचणे गरजेचे आहे. जगातील सुसंस्कृृृत राष्ट्र कोणते असेल.? ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल ती भारतमाता घडवण्याचे कार्य कित्येक वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदानी केले असल्याचे मत राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व शिवभक्त परिवार, इंदापूर आयोजित राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंदापूर येथील कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणुन डाॅ.लक्ष्मण आसबे उपस्थित होते.तर इंदापूर पंचायत समीतीच्या सभापती स्वाती शेंडे, नीरा-भिमा सह.साखर कारखाण्याचे चेअरमन लालासाहेब पवार हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला वीरपत्नी कै. रंजना नामदेव कदम व कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी वावेकानंद यांचे प्रतामेस पुष्पहार अर्पन करण्यात आला.यावेळी वीरपत्नी रोहिणी महादेव सोमवंशी, कांचन रविराज पवार आणि विजया मारुती मारकड यांचेसह माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी आपल्या संस्कारातून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी राजे घडविले. शिवाजु महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा जिजाऊंच्या शिक्षणातून मिळाल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
मनगट आणि मन बळकट असेल तर आपण संकटातून मार्ग काढू शकतो. पतीवर संकट आल्यावर सर्वात अगोदर हातात तलवार घेवुन पतीच्या पुढे उभी राहुन पतीची ढाल बनणारी इतिहासातील पहिली स्त्री म्हणून जिजाऊंचा उल्लेख करावा लागेल असे मत प्रमुख व्याख्याते डाॅ.आसबे यांनी व्यक्त केले. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारकमंडळाचे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगीचे संचालक वसंतराव मोहोळकर, दिपक जाधव, अॅड.शरद जामदार, शकील सय्यद, अॅड मनोहर चौधरी,रघुनाथ राऊत,बाळासाहेब खटके,धनंजय पाटील, प्रशांत उंबरे, आबासाहेब शिंगाडे,सुभाष काळे,गोरख शिंदे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चाकणे यांनी केले तर सुत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.