बीड : बहुजननामा ऑनलाईन – संबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यांनी मिळून मदत कशी करता येईल याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठीच आपण सध्या राज्यातील दुष्काळी भागातील पाहणी करीत असून यासाठी उपाययोजना सुचवण्या संदर्भात आपण येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपताच राज्यातील दुष्काळी दौऱ्यावर निघाले होते सध्या ते ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील आष्टी, पाटोदासह अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या .त्यावेळी तेथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा-पाण्याची टंचाई, कामे नसल्याने नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. अनेक शेतकर्यांना पीक विमा मिळालेला नाही. अशा चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच, अशा भिषण परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली.
येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आपण, राज्य तसेच केंद्र सरकार समोरही मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले .