नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश द्रोहाचा आरोप असलेला जेएनयु विध्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार वर अलीकडेच चार्जशीट दाखल झाली असताना त्याच्याविरुद्ध खटला चालविण्यास मंजुरी द्यावी की, नाही? याबाबत सरकारचा कायदा विभाग विचार करीत आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली. दिल्ली सरकारच्या कामात अडथळा आणून केंद्र सरकार देशद्रोह करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
देशातील हिंसाचार थांबविण्याची ताकद सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गात
केजरीवाल म्हणाले की, मोदी यांनी दिल्लीतील शाळा रोखल्या, हॉस्पिटल रोखले, सीसीटीव्ही कॅमेरे रोखले, मोहल्ला क्लिनिक रोखले, दिल्लीला ठप्प करण्याचा प्रयत्न केला. हा देशद्रोह नाही काय? जेएनयू प्रकरणात दिल्ली सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे. अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेण्यापूर्वीच कन्हैया कुमार व अन्य ९ जणांविरुद्ध देशद्रोहाच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.