भागलपूर : वृत्तसंस्था – बिहार येथील भागलपूर परिसरातील जगदीशपूर येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या गर्भवती बनण्यावर कुटुंबात आणि परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात असून महिलेच्या नणंदेने यासंबंधी डीआयजीकडे तक्रार दाखल केली आहे. वास्तविक, गर्भवती असलेल्या या महिलेचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दीड वर्षाची मुलगीही आहे. तोपर्यंत सर्व काही ठीक होते. त्या महिलेच्या नणंदेच्या म्हणण्यानुसार तिचा भाऊ इथे नसताना, महिला तीन महिन्यांपासून गरोदर आहे. तो कोलकाता येथे सात महिन्यांपासून नोकरी करत आहे तर तिची वाहिनी गर्भवती कशी असू शकते ?
याविषयी महिलेची नणंद संतापली असून ती डीआयजी विकास विभव यांच्यापर्यंत पोहोचली आहे. नणंदेने डीएनए चाचणीची मागणी करण्यास सुरवात केली. डॉक्टरांनी तपासणी केली असता, महिला तीन महिन्याला १२ दिवस कमी गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे. यावर तिच्या नवऱ्याने देखील तिच्यावर संशय घेत , हे कोणाचे मुलं आहे ? असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. पण महिलेने यावर कोणतेही उत्तर दिले नाही.
जेव्हा संपूर्ण कुटुंबाने संताप व्यक्त केला त्यावर ती म्हणाली की, ‘तुम्हाला घरात ठेवायचे असेल तर ते ठेवा, नाहीतर… मी तुम्हाला एखाद्या खोटा खटल्यात अडकवीन.’ परंतु या धमकीचा काहीही परिणाम झाला नाही आणि कुटुंबीयांनी तिला घरात ठेवण्यास नकार दिला. प्रकरण येथेच संपले नाही. घरातील सदस्यांनी महिलेला एकत्र ठेवण्यास नकार दिल्यानंतर पंचायत बसली. तिथे महिलेने सांगितले की, मूल तिच्या पतीचे आहे. तिचा नवरा स्वप्नात येत असे आणि यामुळेच ती गर्भवती झाली. अशी उडवाउडवीची उत्तरे ती देऊ लागली. ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. दरम्यान पंचायत बैठकीच्या वेळी महिलेचा फोनही तपासला गेल्यावर तिची पोल उघडली, तिच्या फोनमध्ये एका मुलाचा नंबर सापडला. त्यामुळं तिचे संबंध होते, हे मूल त्या मुलाचेच आहे.
Visit : bahujannama.com