मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट पडली आहे. नकुतीच एमआयएमचे खासदरा इम्तियाज जलील यांनी आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. आघाडीकडून फक्त 8 जागा मिळत असल्याने बाहेर पडत आहोत असेही त्यांनी म्हटले होते. यानंतर जलील यांच्यावर आघाडीच्या प्रवक्त्यांकडून आरोप करण्यात आला की, जलील एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे ऐकत नाहीत असा आरोप करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, “असा घाणेरडा आरोप केला तर लक्षात ठेवा मी तुमच्यापेक्षा जास्त बोलू शकतो. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नुकतीच जलील यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यानंतर वंचितचे प्रवक्ते सचिन माळी यांनी जलील यांच्यावर आरोप करत म्हटले की, “जलील हे खासदार झाल्याने त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. जलील हे पक्ष प्रमुख ओवेसी यांचे आदेश पाळत नाहीत असाही आरोप वंचितकडून करण्यात आला होता.
यालाच प्रत्युत्तर देत जलील म्हणाले की, “मी आघाडी होणार नसल्याचे पत्रक काढल्यानंतर कुणी पु्ण्यात तर कुणी अकोल्यात पत्रकार परिषद घेत आहे. आरोप करत आहेत की, जलील आणि ओवेसी यांच्यात मतभेद आहेत. मात्र लक्षात ठेवा असा घाणेरडा आरोप केला तर तुम्हाला जेवढं बोलता येतं त्यापेक्षा जास्त मी बोलू शकतो.” असा इशाराच त्यांनी वंचितला दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझ्यासाठी असदुद्दीन ओवेसी हे महत्त्वाचे आहेत. त्यांनी सांगितले तर एका मिनिटात मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र खोटे बोलून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वंचितने करू नये.”