बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तान कधीही अणुयुद्ध सुरू करणार नाही. मी शांततावादी आहे, मी युद्धविरोधी आहे. युद्धामुळे समस्या सुटत नाहीत. युद्धाचे अनपेक्षित परिणाम आहेत. अशा प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिल्या आहेत.
मुलाखती दरम्यान, त्यांनी भारताशी युद्ध झाले तर युद्धात पाकिस्तान पराभूत होऊ शकतो असेही त्यांनी कबूल केले. जर एखादा देश युद्धात पराभूत होऊ लागला तर त्याच्याकडे दोनच पर्याय उरतात. एकतर शरण जाणे किंवा स्वातंत्र्यासाठी लढा देणे. पाकिस्तान स्वातंत्र्यासाठी मृत्यूशी झुंज देत आहे, जेव्हा अण्वस्त्रधारी देश मृत्यूशी झुंज देत असतो तेव्हा त्याला त्याचे स्वत:चे दुष्परिणाम सोसावे लागतात. व्हिएतनाम आणि इराकमधील युद्ध पाहता युद्धामुळे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्या इतर समस्यांपेक्षाही जास्त गंभीर आहेत.
तसेच, काश्मीर मुद्दयावर भारताशी बोलण्याची कोणतीही शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने जर काश्मीर प्रश्न सोडविला नाही तर त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होऊ शकतो. या कारणास्तव आम्ही संयुक्त राष्ट्राकडे संपर्क साधला आहे आणि प्रत्येक आंतरराष्ट्रीय फोरमशीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करत आहोत.
त्यापूर्वीच्या इमरान यांनी काश्मिरच्या मुद्द्यावरील लेखात भारताबरोबर अण्वस्त्र युद्धाची धमकीही दिली होती. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याबाबत ते म्हणाले की, काश्मीरला भारताने “बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले” आणि एकतर्फी आंतरराष्ट्रीय कायदे मोडले आहेत. वास्तविक खान अजुनही कश्मीर राग गात आहेत. देशांतर्गत राजकीय वातावरण आणि जनरल कमर जावेद बाजवा यांच्या राजकीय दबावाखाली खान हताश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एका वृत्तपत्राद्वारे दिलेल्या लेखात दोन शेजारी देशांमधील अणुयुद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे.