मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत येत्या 9 ते 12 जून या चार दिवसाच्या कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सर्व जिल्ह्याच्या यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या काळात कोरोनासह इतर कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवत अडथळा येणार नाही याची काळजी घ्या, असा सूचना दिल्या आहेत. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे असेही आदेशही मुख्यमंत्र्यांनी Uddhav Thackeray दिले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.
त्यावेळी ते बोलत होते. अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.
जनरेटर्स, डिझेल, ऑक्सिजनचा साठा करून ठेवावा, वीजेचे बॅकअप
कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
तसेच अतिवृष्टीमुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना अडचण होणार नाही,
पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
कृपया हे देखील वाचा:
वाहन आणि मोबाईल चोरी करणार्या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल
एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’
कामगार तरूणाने मित्रांना बोलावून सुपरवायझरवर केले कोयत्याने वार, नर्हे येथील घटना
ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी पर्याय
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे दिल्ली जाणार, पंतप्रधान मोदींची घेणार भेट !