सातारा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असून ईव्हीएम मशिन बद्दल अनेक तक्रारी राज्यातून तसेच देशभरातून समोर आल्या आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएमबद्दल मोठं विधान केलं आहे . ते म्हणाले कि , मी स्वत: अनुभव घेतला आहे. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे.मला ईव्हीएमबद्दल चिंता वाटत आहे .पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते .
देशातील सगळ्याच ईव्हीएम मशीनमध्ये असं असेल असं मी म्हणत नाही मात्र मी हे पाहिलेलं आहे म्हणून मी काळजी व्यक्त केली असे पवार म्हणाले. यासाठी आह्मी कोर्टात धाव घेतली होती आमच्याबरोबर २१ विरोधी पक्षांनी या ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदणीची मागणी केली होती.मात्र दुर्दैवानं कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या. त्या चिठ्ठ्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या देखील होत्या मग आता का शक्य नाही असेही पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची गुरूवारी ६० वी पुण्यतिथी आहे कार्यक्रमानिमित्त पवार साहेब बोलत होते . यावेळी संस्थेचे सदस्य रामराजे ना.निंबाळकर, प्रा. डॉ. एन.डी.पाटील, आ.दिलीप वळसे-पाटील, आ.अजित पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विश्वजीत कदम आदी उपस्थित राहणार होते.