बार्शी : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीची आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी सुरू केली आहे. दक्षिणमध्य मुंबई, वर्धा, रामटेक आणि सोलापूर जागांवर आरपीआयने आपला हक्क सांगितला असून, सोलापूरसाठी सरवदे यांना उमेदवारी द्यावी. भाजप युतीने आरपीआयला सोलापूरची जागा न सोडल्यास आरपीआय स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा इशारा, शहराध्यक्ष अॅड्व्होकेट अविनाश गायकवाड यांनी दिला.
पक्षनेते खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सोलापूर येथील नॉर्थकोट मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठका आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार बार्शीतील सावळे सभागृहात येथे बैठकीत जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते बोलत होते.