नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टिकास्त्र सोडले आहे. मोदींना शाहबानो आठवते. परंतु त्यांना तबरेज अन्सारी, अखलाख, आणि पहलू खान आठवत नाहीत. त्यांच्याच मंत्र्याने अलीमुद्दीन अन्सारी यांची हत्या करणाऱ्यांना हार घातले होते. जर कोणी गटाराची टिप्पणी करत असेल, तर मग मुस्लीमांना आरक्षण का नाही देत ? सवाल त्यांनी उपस्थित केला.
A Owaisi: No Muslim MP from your party comes. Who is keeping them behind? You. There's a difference b/wtheir words&ideology. Narasimha Rao was responsible for Babri Masjid demolition, despite being PM he couldn't do anything. Now there's PM Modi who wants to work on his ideology.
— ANI (@ANI) June 26, 2019
तसेच ते म्हणाले की, बाबरी मशिद पाडण्यासाठी नरसिंह राव जबाबदार होते. त्यांनी त्यावेळी पंतप्रधान असतानाही काहीच केले नाही. आता मोदीही त्यांचीच विचारधारा चालवत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.
AIMIM MP Asaduddin Owaisi: PM remembers Shah Bano. Didn't he remember Tabrez Ansari, Akhlaq, Pehlu Khan? Didn't he remember that his Minister had garlanded the murderers of Alimuddin Ansari? If someone is making the 'gutter' comment, then why do you not give Muslims reservation? pic.twitter.com/EBrJxemph0
— ANI (@ANI) June 26, 2019
मंगळवारी पंतप्रधान मोदींनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. त्यावेळी कॉंग्रेस सरकारच्या काळात एका मंत्र्याने मुस्लीमांना गटारात राहायचंय तर राहू द्या असं विधान केलं होतं. त्याची आठवण करून दिली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला होता. त्यावर ओवेसी यांनी मोदींवरच पलटवार केला. कोणी गटारात राहण्याबद्दल बोलत असेल तर मुस्लीमांना बाहेर काढा, मोदींनी त्यांना आरक्षण द्यावे.