बहुजननामा ऑनलाइन – आज परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा पार पडला. यावेळी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चुका माणसांकडून होतात, पक्षावर कशाला राग काढता, असा सवाल एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची काढण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘नाथाभाऊंच्या वेदना समजू शकतो. त्यांनी दुःख व्यक्त केले. त्याच चूक नाही. आपल्या तक्रारी आणि व्यथांची पक्ष दखल घेईल, त्यावर उत्तर काढू, पण भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरू नका, अशी दोघांना विनंती, त्याचे ओरखडे राहतात. तुम्ही स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. कारण ही पक्षाची चुक नसून माणसांची आहे. तुम्ही पक्षावर कशाला राग काढता. तुम्ही असे म्हणा की, तु काल आला आहेस. आम्ही पक्षातच राहणार आहे. तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा.’
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ‘गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेमुळेच आम्ही शरद पवार यांना सामोरे जाऊ शकलो. पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकू शकलो. गेल्या पाच वर्षात गोपीनाथ यांच्या प्रेरणेमुळे पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याशिवाय, गोपीनाथ मुंडे भरल्या ताटावरुन उठून गेल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, पण मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी कुटुंबाला समर्थपणे सावरले.’
गोपानाथ मुंडेंच्या आठवणींना एकनाथ खडसे यांनी उजाळा दिला. यावेळी शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. असे एकनाथ खडसे म्हणाले. त्याचबरोबर भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला.