मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना ईव्हिएमवर पुन्हा संशय व्यक्त करत कम्प्युटर हॅक होऊ शकतो, मग ईव्हिएम का हॅक होऊ शकत नाही म्हणत इलेक्ट्रॉनिक इंजिनियरच यावर भाष्य करू शकेल असे मत व्यक्त केले आहे. उदयनराजेंनी खास पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले उदयनराजे ?
या देशातील लोकशाही अबाधित राहिली पाहिजे
यावेळी उदयनराजे म्हणाले की, मी देशाचा एक खासदार, नागरिक म्हणून मी माझं मत मांडतोय लोकशाही कशी अबाधित राहिल याचा विचार करून ही पत्रकार परिषद घेतली असल्याचे उदयनराजे म्हणाले.
त्यावेळी झालेला रक्तपात पुन्हा घडू नये
भारतात विभिन्न जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला वाटते की हा देश कायम अबाधित राहिला पाहिजे. भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाल्यामुळे अनेकांचे नातेवाईक त्या देशात गेले. त्यावेळी झाला तो रक्तपात पुन्हा घडू नये असे आपल्याला वाटते असे उदयनराजे म्हणाले.
कम्प्युटर सर्वात चांगले, तेही हॅक होते, मग
जगातील कोणतेही मशीन माणूसच बनवतो. कॉम्प्युटर हे सर्वात चांगले यंत्र आहे. तेदेखील हॅक होते. मग ईव्हिएम हॅक का होऊ शकत नाही. साताऱ्यात एकूण मतदान आणि निकालातील मतदान यात तफावत आढळून आली आहे. आज बँलेट पेपरवर मतदान ध्यावे त्याचा खर्च मी करेन असेही ते यावेळी म्हणाले.
सातारा मतदार संघात तफावत
सातारा लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान आणि निकालातील मतदान यात तफावत असल्याचे उदयनराजे म्हणाले. त्यांनी हे दाखविताना वाईमध्ये त्यांना ३४४ मते अधिक, कोरेगावात ५, उत्तर कराडमध्ये १४८, दक्षिण कराडमध्ये ५, पाटणमध्ये ९७ मते अधिक पडल्याचे दिसून आले. हे कसे होऊ शकते असा सवाल त्यांनी व्यक्त केला.