बहुजननामा ऑनलाईन– इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरातील पहिल्या टप्प्यातील सिरो सर्व्हेचा निकाल जाहीर केला आहे. हे निकाल आश्चर्यकारक आहेत. सर्वेक्षणानुसार, मे पर्यंत देशातील जवळपास ६४ लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. हे सर्वेक्षण प्रथमच राष्ट्रीय पातळीवर करण्यात आले. मे पर्यंत ०.७३% प्रौढ म्हणजेच ६४ लाख (६४,६८,३८८) लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अंदाज लावला जात आहे. सर्वेक्षणानुसार असा अंदाज लावला गेला की, आरटी-पीसीआर चाचणीद्वारे कोरोनाच्या प्रत्येक प्रकरणाची पुष्टी करण्यासाठी भारतात ८२-१३० संसर्ग होते. सिरो सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की, खेड्यातील सुमारे ४४ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
काय आहे SERO SURVEY?
या सर्वेक्षणानुसार सामान्यतः हे निश्चित केले जाते की, एखाद्या जिल्हा किंवा शहरात किती लोक कोरोनाने संक्रमित होऊन बरे झाले आहेत. हे शरीरात उपस्थित अँटीबॉडीद्वारे शोधले जाते. या व्यतिरिक्त कोरोना समुदाय प्रसाराच्या मार्गावर पोहोचला आहे की नाही हे देखील यामुळे समजते. यावर्षी मे महिन्यात वेगवेगळ्या शहरे व राज्यात लॉकडाऊन दरम्यान सिरो सर्व्हेची पहिली फेरी केली गेली होती.
सर्वेक्षणाचे परिणाम
आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, ११ मे ते ४ जून दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. या काळात ४,२८,००० प्रौढांचे नमुने घेण्यात आले. २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. बहुतांश सर्वेक्षण ग्रामीण भागात केले गेले. क्षेत्रानुसार सकारात्मकता अशी होती- ग्रामीण- ६९.४%, शहरी झोपडपट्टी- १५.९%, शहरी नॉन-स्लम- १४.६%. वयानुसार सकारात्मकतेचा दर असा होता – १८-४५ वर्षे- ४३.३%, ४६-६० वर्षे- ३९.५%, ६० वर्षांपेक्षा जास्त- १७.२%.
ग्रामीण भागात चिंता वाढली
देशात कोविड-१० च्या प्रकरणांची संख्या ४० लाखांवर गेली असून ग्रामीण भागातही त्याच्या प्रसाराबाबत चिंता वाढली आहे, कारण तेथे वैद्यकीय सुविधांच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. भारताचा १.३ अब्ज लोकसंख्येपैकी ६५ टक्के हिस्सा खेड्यांमध्ये आहे. तर ‘हाऊ इंडिया लिव्ह्स’ वेबसाइटनुसार, देशात ७१४ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे आढळली आहेत, ज्यामुळे ९४.७६ टक्के लोक धोका पत्करत आहेत.