बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला सतत डावल्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे, अशी टीका प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवार असे नेते करीत असतानाच विधानसभेच्या पराभावानंतर पक्षाचे कुठे चुकले, एवढ्या जागा कमी का झाल्या याचे कसलेही चिंतन झालेले नाही. पराभवास जबाबदार असणाऱ्यांची नावे आम्ही दिली, पण त्याची कसली चौकशी केली नाही, की विचारपूस केली नाही, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकनाथ खडसे आणि प्रकाश शेंडगेंच्या वक्तव्यावर स्टष्टीकरण देताना गिरीश महाजन यांनी ओबीसी नेत्यांनाच भाजपामध्ये सर्वाधिक स्थान असल्याचे म्हटले जात आहे. ज्यांनी ज्यांनी निवडणुकीत नेतृत्व म्हणून जबाबदारी घेतली होती त्यांना या पराभावाचा जाब विचारला पाहिजे. पक्ष कधीच वाईट नसतो. लोकसभेला आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पुण्याईमुळे मोठे यश मिळाले. काहींना ते यश स्वतःच्या कामगिरीबद्दल वाटत असेल. तरी त्यांनी तसे समजण्याचे कारण नाही. असे म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.
खडसेंच्या प्रश्नाला उत्तर देत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हान केले की, विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव करणाऱ्या एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी जाहीर करावीत. शुक्रवारी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ओबीसी नेत्यांना भाजपाने कधीही डावलले नाही. ओबीसी नेत्यांना आणि मानाचे आणि सर्वाधिक स्थान दिले आहे. कोणते नेते एकत्र झाले हेच मला कळाले नाही ? भारतीय जनता पक्षातील १०५ आमदारांपैकी ओबीसींची संख्या मोजा, टक्केवारीनुसार सर्वात मोठी संख्या ओबीसीचीच आहे. बहुजन समाज, मराठा समाजाचेही आमदार तेवढेच आहेत.
मंत्रिमंडळाचा विषय घेतला, तर ओबीसी नेत्यांचीच सर्वाधिक संख्या होती. पंकजा मुंडें, मी स्वत: ओबीसी, बावनकुळे ओबीसी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे आम्हा ओबीसींचीच संख्या जास्त होती, असे म्हणत ओबीसी नेत्यांना डावलण्याचा मुद्दा महाजन यांनी खोडून काढला आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले की, पकजा मुंडे यांचा पराभव करण्यात स्वकीयांचाच हात आहे. याआधी देखील गोपीनाथ मुंडे यांना पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये जाण्याची वेळ आणली होती. तर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, बहुजन समाजाच्या नेत्यांना, ओबीसी चळवळीतील नेत्यांना भाजपने कधीही स्थान दिले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिकीटे दिली गेली नाहीत. पंकजा मुंडे यांचा ज्यांनी गेम केला त्यांच्यावर त्यांनी अचूक नेम धरला आहे. तो ते कोणत्या दिशेने आहे हे १२ तारखेला कळेल.
Visit : bahujannama.com