बहुजननामा ऑनलाइन टीम – तेलंगनात(Hyderabad) जोरदार पावसानंतर पूराची स्थिती गंभीर होत चालली आहे. राज्यातील विविध भागात सुमारे 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. हैद्राबादमध्ये(Hyderabad) अचानक आलेल्या पूरात एकाच कुटुंबातील 9 लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, ज्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. अन्य 4 मृतदेह सापडले आहेत.
हैद्राबादच्या फलकनामा परिसरात अलजुबैल कॉलनीत बुधवारी पूराच्या भीषण संकटात एक संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. एकाच कुटुंबातील 9 लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले, ज्यापैकी एकाला वाचवण्यात आले. या व्यक्तीचा वेगवान प्रवाहात वाहत असतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. सुदैवाने या व्यक्तीस फलकनुमाजवळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद अब्दुल ताहिर कुरैशी आहे. त्याने आपल्याला कसेतरी करून वाचवले. त्याच्या सोबत कुटुंबातील एकुण 9 लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेले होते. मुसळधार पावसामुळे पल्ले चेरुवु (तलाव) चा किनार फुटल्याने अचानक आलेल्या पूराच्या पाण्यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली होती, ज्यामुळे कुटुंबातील 9 लोक एका सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते स्वताला वाचवू शकले नाहीत, आणि सर्वजण वाहून गेले.
वाहून गेलेल्या 8 पैकी 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. आता अब्दुल ताहिर कुरैशीने सरकारला आपल्या कुटुंबातील अन्य 4 लोकांचा शोध घेण्याची विनंती केली आहे. बुधवारी ताहिरने आपल्या कुटुंबातील चार सदस्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
या दरम्यान, गुरूवारी हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी फलकनुमा येथे पोहचले आणि आपल्या उपस्थितीत त्यांनी तो रस्ता तोडून टाकला, जो पाण्याच्या वेगावान प्रवास कारणीभूत ठरला होता.