मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हैद्राबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि जाळून मारल्याच्या प्रकरणातील आरोपींचा हैद्राबाद पोलिसांनी पहाटे ३ वाजता एन्काऊंटर केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर देशभरातून कौतुक आणि आभार मानले जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या या थेट भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘भारतीय लोकशाहीत न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे. न्यायालयाची भूमिका संपवायची आहे का ? संविधान बदलण्याचा घाट घातल्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी केला.
सचिन माळी म्हणाले की, ‘या घटनेनंतर ज्या गुन्हेगारांची नाव पुढे आलीत, ते खरंच गुन्हेगार आहेत का ? अश्या प्रकरणांमुळे बाबासाहेबांच्या घटनेमुळे ज्यांचे हात बांधले गेलेत ते हात सैल केले जात आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होतो. संविधानाच्या चौकटीत न राहता या गोष्टी घडविल्या जात आहे. हा न्यायालयाचा अपमान आहे. या घटनेची न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली १०० टक्के चौकशी झाली पाहिजे. तसेच लोकशाही प्रक्रियेत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. ही प्रथा पडली तर गुन्हेगाराची चौकशी न करता थेट एन्काऊंटर केला गेला तर खूप गंभीर आहे, असा इशाराही सचिन माळी यांनी दिला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनीदेखील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया ओलांडता येत नाही. पोलिसांनी कायदा हातात घेत झटपट न्याय देण्याची प्रथा सुरु केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. मात्र, हैदराबादमध्ये जे घडलं त्यामुळे देशातील इतर पोलिसांना हिंमत मिळाली असेल. तसेच पोलिसांच्या या कारवाईने मुलींना आणि महिलांना बळ मिळालं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ही फाईल बंद करा, कायद्यात चौकटीत ही घटना आणणं योग्य नाही. सरकारने आणि कोर्टाने त्यांच्या पाठिशी राहिलं पाहिजे. उन्नावबाबतीत जे घडलं तसं यापुढे व्हायला नको. आरोपींनी जेलमधून सुटून बलात्कार पीडितेला जाळलं हे कृत्य निषेधाचं आहे असंही मत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले आहे.
Visit : bahujannama.com