बहुजननामा ऑनलाईन टीम : हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट होती. या प्रकरणातील अटक करण्यात आलेले चारही आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाले. दरम्यान, या चारही आरोपींना प्रकरणाचा अधिक तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना इशारा देऊही त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.
मात्र, या घटनेचे देशभरातून कौतुक होत आहे. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने देखील पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे. “आज सकाळी मनाला सुखावणारी बातमी मिळाली. हैदराबादमध्ये झालेली चकमक म्हणजे कायद्याच्या रक्षकांनी समाजातील राक्षसांवर मिळवलेला विजय आहे. पोलीस विभागाला कोटी-कोटी प्रणाम. निर्णय घेण्याची पद्धत कोणतीही असो, पण जे झाले ते प्रशंसनीय आहे”, असे ट्विट करत योगेश्वर याने पोलिसांचे कौतुक केले आहे.
सुप्रभात!
आज सुबह-सुबह दिल को सुकून पहुंचाने वाली खबर मिली।हैदराबाद में यह एनकाउंटर हमारे कानून के रक्षकों की समाज के राक्षसों पर शानदार विजय है। पुलिस विभाग को कोटि – कोटि नमन। निर्णय का तरीका चाहे जो रहा हो परंतु इसमें लिया गया समय काबिले-तारीफ है।#Encounter #EncounterNight
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) December 6, 2019
तसेच पीडितेच्या कुटुंबियांकडून देखील या प्रकरणाद्दल दिलासा व्यक्त केला जात आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपी मारले गेले आहेत, ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला. पण या प्रकरणातील आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनीदेखील घडलेल्या घटनेचे समर्थन केले आहे. या प्रकरणाबाबत संपूर्ण देशात संतापाची लाट होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते, तर पुन्हा अशी घटना घडली असती. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Visit : bahujannama.com