बहुजननामा ऑनलाईन टीम : हैदराबादच्या सुंदर रमैया नावाच्या व्यक्तीने पाण्याद्वारे चालणारे इंजिन शोधले आहे. हे इंजिन वापरुन कोणत्याही वाहनाला एका लिटर पाण्यात 30 किमी पर्यंत चालवता येणार असल्याचा दावा रमैया यांनी केला आहे. अभियंता सुंदर रमैया म्हणतात की, वॉटर फ्युएल टेक्नॉलॉजीची इंजिन धुराऐवजी ऑक्सिजन सोडतील, त्यामुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या पूर्णपणे सुटेल. यामुळे वातावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. वाहनाचे आयुष्यही वाढेल.
मंगळवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, हे वॉटर इंधन इंजिन बसेस आणि ट्रक सारख्या मोठ्या वाहनांना चालविण्यासाठीही वापरता येऊ शकते. रमैयाचा असा दावा आहे की, वाहनांमध्ये पाण्याचे उर्जा चालविणारे इंजिन लावल्यानंतर एक लिटर पाण्याच्या मदतीने 30 किमी पर्यंत अंतर व्यापता येते. याशिवाय देशातील वेगवेगळ्या राज्यात त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाहनांचे प्रदूषण रोखले जाईल.
Visit : bahujannama.com