बहुजननामा ऑनलाईन टीम : आजकाल, रोज नवीन आणि विचित्र घटना एकायला मिळतात. अशीच एक विचित्र घटना समोर आली. नोएडा सेक्टर-34 मधील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा एक तरुण ठाणे इंदिरापुरमच्या न्याय खंड कॉलनीत राहतो. या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण अभियंता आहे आणि त्याचे दीड वर्षांपूर्वी दिल्लीच्या करोल बाग येथील मुलीशी लग्न झाले होते आणि लग्नानंतर सर्व काही चांगले होते.
त्याचवेळी या तरुणाची बायको काही दिवसांनी अॅक्टिंग क्लाला जाऊ लागली आणि पतीने त्यावर काहीच हरकत घेतली नाही. त्याच वेळी सर्व काही व्यवस्थित चालू होते, परंतु काही दिवसानंतर ती अॅक्टिंग क्लासवरुन घरी परत यायची तेव्हा ती सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह रहायला लागली, ज्यामुळे तिचा नवरा अस्वस्थ होऊ लागला. यानंतर तिने टिक-टॉक व्हिडिओ व्यतिरिक्त फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अधिक वेळ घालविण्यास सुरुवात केली.
यावरुन पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होण्यास सुरुवात झाली. या तरुणाने आरोप केला आहे की, त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत त्याला जागवते आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर तिचा व्हिडिओ काढण्यास सांगते. त्याचबरोबर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर आपल्या मित्रांबरोबर चॅट करते. या गोष्टीवरुन त्यांच्यात अनेकदा वाद झाले. तो तरुण म्हणाला की, “एवढेच नव्हे तर त्याच्या पत्नीनेही अशी धमकी दिली की तुम्ही जर माझे ऐकले नाही तर मी तुमच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावून तुरूंगात पाठवीन.” वारंवार अशा धमक्या दिल्याने तरुण खूप वैतागला आणि आणि शेवटी तो गाझियाबाद कोर्टात गेला आणि त्याने न्यायालयात घटस्फोटाची मागणी केली.
Visit : bahujannama.com