बहुजननामा ऑनलाईन टीम : जालंधर गावात पातारा येथे दोन मुलांच्या आईने सल्फास गिळून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, पतीचे एका मुलीशी संबध असल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. मीना कुमारी असे मृत्यू महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनूसार, मृत्यू झालेल्या महिलेची आई मंजीत कौर व वडिल बलविंदर सिंग आणि आत्या सुनीता कुमारी व कुटुंबातील इतर सदस्यांना जेव्हा मीनाने सल्फास गिळाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब तिला रामा मंडीच्या जौहल रूग्णालयात दाखल केले. तेथेच काही काळानंतर तिचा मृत्यू झाला.
डॉ.बी.एस. जोहल म्हणाले की, तिच्या शरीरात सल्फास विषबाधा झाल्यामुळे मीनाला वाचवता आले नाही. मुलीच्या मृत्यूविषयी ऐकून आई मनजीत कौर यांना मोठा धक्का बसला. आत्या सुनीता यांनी सांगितले की, सकाळी मीनाशी फोनवर जेव्हा त्या बोलल्या तेव्हा ती म्हणाली की, तिचा पती राकेशकुमार केशा यांचा घराजवळ राहणाऱ्या मुलीशी अवैध संबंध आहे. त्यामुळे ती आत्महत्या करत आहे. आत्त्याच्या म्हणण्यानुसार, राकेशकुमार यांना अनेकदा त्यांची पत्नी मीनाने समजावून सांगितले होते, परंतु सुधार न झाल्यामुळे मीना खूप कंटाळली होती आणि त्यामुळे तिने आपले जीवन संपवले.
या घटनेचा तपास करत पोलिस ठाणे पटाराचे ASI निर्मलसिंग हीर यांना मृत महिलाचे वडील बलविंदर सिंग यांनी सांगितले की, मुलीच्या मृत्यूसाठी तिचा नवरा जबाबदार आहे. SHO पटारा दलजितसिंग यांनी सांगितले की, मृत महिलाचे वडील बलविंदरसिंग यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी पती राकेश कुमार केशा आणि त्याच्याशी संबंधित मुलीवर कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी मृत महिला मीनाचे शवविच्छेदन केले जाईल. तिचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com