मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तर खासदार संभाजीराजे आणि भाजपातील काही नेत्यांमध्ये सध्या तात्विक वाद दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच संभाजीराजेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. मात्र, मराठा आरक्षणावरुन Maratha reservation भाजपाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटनेचे संस्थापक भाजप पदाधिकारी कसे? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपाने याचे उत्तर द्यावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनाही सावंत यांनी लक्ष्य केले आहे.
सचिन सावंत यांनी ट्विटरवरून भाजपाच्या विदर्भातील नेत्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, भाजपाचे हे नेते मराठा आरक्षणविरोधातील संघटनेचे संस्थापक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे आहेत. ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे?, असा प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. भाजपाची मराठा समाजाशी ही गद्दारी नाही का?, असा सवालही सावंत यांनी विचारला आहे. सावंत यांनी या ट्विटसोबत डॉ. मिरार हे भाजपाचे नेते असल्याचे काही पुरावेही जोडले आहेत. त्यामुळे, आता भाजपाकडून काय स्पष्टीकरण येणार, हे पाहावे लागणार आहे.
मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? @BJP4Maharashtra ने उत्तर द्यावे. @ChDadaPatil जी ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का? pic.twitter.com/qNrljdm5vo
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 28, 2021
दरम्यान मराठा आरक्षणावरून Maratha reservation राज्यसभेचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र यावरून नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरतायेत ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत. ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्याबाबत असे बोलणे चुकीचे आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपाने दिले आहे. ज्यांच्या दारी फिरतायेत त्यांनी काय केलं? शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.