बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून म्हटले की, राज्याच्या आतील व बाहेरची वाहतूक थांबवू नये. असे केल्याने गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होईल. यासह, अजय भल्ला म्हणाले की, स्थानिक, आंतरराज्यीय स्तरावर वाहतूक ठप्प झाल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होत असून आर्थिक पातळीवरही याचा परिणाम होत आहे.
कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे बहुतेक राज्यात ट्रकच्या वाहतुकीवर बंदी आहे. यामुळे गृहमंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून सरकारची मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यास सांगितले आहे.