मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक असून महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
आपल्या टि्वटमध्ये राज ठाकरे म्हणतात की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंह यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यातलं वातावरण तापलं आहे.