बहुजननामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणारे विधेयक सादर करताना आपल्याला भीती वाटली असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. चेन्नई येथे एका कार्यक्रमात अमित शहा म्हणाले की हे विधेयक मांडताना त्यांना अशी भीती होती की जेव्हा ते राज्यसभेत हे विधेयक मांडतील तेव्हा राज्यसभा कशी चालविली जाईल ?
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिला प्रतिक्रिया दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणारे विधेयक सादर करताना आपल्याला भीती वाटली असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. अमित शाह म्हणाले की, गृहमंत्री म्हणून त्यांच्या मनात संशय नाही की संविधानाची ही तरतूद जम्मू-काश्मीरमधून रद्द केली पाहिजे. हे विधेयक मांडताना त्यांना अशी भीती होती की जेव्हा ते राज्यसभेत हे विधेयक मांडतील तेव्हा राज्यसभा कशी चालविली जाईल ?
दरम्यान राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावरील “Listening, Learning and Leading” या पुस्तकाचे प्रकाशन करताना अमित शहा म्हणाले की, “आंध्रच्या फाळणीचे दृश्य अजूनही देशातील लोकांसमोर आहे. माझ्या मनात काही शंका नाही मी अशा दृश्याचा भाग होणार नाही. सर्व विरोधकांच्या मित्रांचे ऐकणे म्हणजे वेंकय्याजींच्या कौशल्याचा परिणाम आहे असेही ते म्हणाले.
अमित शहा म्हणाले की राज्यसभेत आपल्याकडे पूर्ण बहुमत नाही, तरीही राज्यसभेत, नंतर लोकसभेत आधी हे विधेयक घेण्याचा निर्णय मी घेतला होता. खासदार म्हणून माझा ठाम विश्वास आहे की जम्मू काश्मीरमधून खूप आधी कलम ३७० रद्द व्हायला हवे होते. ही तरतूद हटविण्याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात याबद्दल माझ्या मनात अजिबात संभ्रम नव्हता. अमित शहा म्हणाले की काश्मीरमधून दहशतवाद संपेल आणि काश्मीर विकासाच्या दिशेने जाईल असा माझा विश्वास आहे.
दरम्यान गृहमंत्री अमित शहा म्हणाले, वेंकय्या नायडूंनी कलम ३७० च्या विरोधात आंदोलन केले होते. कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव आला तेव्हा वेंकय्या नायडू राज्यसभेचे अध्यक्ष होते. अमित शहा यांनी एका घटनेचा संदर्भ देताना सांगितले की एकदा कम्युनिस्ट प्राध्यापकाने व्यंकय्या नायडू यांना विचारले की, “तुम्ही कधी काश्मीर पाहिले आहे का?” जर तुम्ही काश्मीर पाहिले नाही तर मग तुम्ही आंदोलन का करता? व्यंकय्या जी उत्तर दिले की एक डोळा दुसऱ्या डोळ्याला कधीच दिसत नाही, पण एका डोळ्याला जर त्रास होत असेल तर दुसऱ्या डोळ्याला ते लगेच जाणवत.