बहुजननामा ऑनलाईन – भारताचा काश्मीर हा अविभाज्य भाग आहे. संसद हे काश्मीरसाठीही सर्वोच्च आहे. काश्मीरबाबत नवे कायदे आणि संविधानात बदल करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ज्यावेळी मी जम्मू आणि काश्मीर असा उल्लेख करतो, त्यावेळी त्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई म्हणजेच चीनव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. हे दोन्हीही भारताचाच भाग आहे असे अमित शाहा यांनी लोकसभेत ठामपणे सांगितले. जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आज संसदेत कामकाज सुरु होताच अमित शाहांनी निवेदन सादर केले. यावेळी ते बोलत होते.
Union Home Minister Amit Shah, in Lok Sabha: Main sadan mein jab jab Jammu and Kashmir rajya bola hoon tab tab Pakistan occupied Kashmir aur Aksai Chin dono iska hissa hain, ye baat hai. pic.twitter.com/Juft5KViMw
— ANI (@ANI) August 6, 2019
यादरम्यान काँग्रेसने लोकसभेत काश्मीर मुद्द्यावरून एकप्रकारे सेल्फ गोल केला होता. खासदार अधीर रंजन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात प्रलंबीत असल्याचे नमूद करताच, सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर आगपाखड केली.
Adhir Ranjan Chowdhury, Congress, in Lok Sabha: You say that it is an internal matter. But it is being monitored since 1948 by the UN, is that an internal matter? We signed Shimla Agreement & Lahore Declaration, what that an internal matter or bilateral? pic.twitter.com/UPLd8BgwS6
— ANI (@ANI) August 6, 2019
याला उत्तर देत अमित शाहा म्हणाले की, भारताचा काश्मीर हा अविभाज्य भाग आहे, त्याबाबत संयुक्त राष्ट्राने का ढवळाढवळ करावी असे तुम्हाला वाटते. असा प्रश्न त्यांनी काँग्रेस समोर उपस्थित केला. संसदेला काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही शाहांनी नमूद केले. यावेळी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सरकारने नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. यावर अमित शाहांनी कुठल्या नियमांचा उल्लंघन झाला आहे ते सांगावे, असा सवालही उपस्थित केला आहे.
Union Home Minister Amit Shah moves the resolution to revoke #Article370 in Jammu and Kashmir, in Lok Sabha. pic.twitter.com/aRzAMul64G
— ANI (@ANI) August 6, 2019