बहुजननामा ऑनलाइन टीम – देशाला हादरुन टाकणाऱ्या हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने ही याचिका दाखल करुन घेतली आहे. त्यामुळे आता पोलिसांना सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. ९ डिसेंबरला या प्रकरणाची पुढची सुनावणी असून त्या आरोपींच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार न करण्याचा आदेश कोर्टाने पोलिसांना दिला आहे. ही याचिका काही संघटनांनी दाखल केली आहे. त्यामुळे आता यापुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसांची कसोटी लागणार असून त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर देत सगळे पुरावे सादर करावे लागणार आहेत.
Telangana High Court has directed that the bodies of the four accused (in rape and murder of woman veterinarian), who were killed in the encounter today be preserved by the State till 08:00 pm on December 9. pic.twitter.com/SAeydG3kwZ
— ANI (@ANI) December 6, 2019
हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ‘आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला असे समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती जिवंत होती,’ असे आरोपींने म्हटले होते.
आरोपींनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर ती पळून जाऊ नये म्हणून तिचे हातपाय बांधले. त्याचबरोबर तिला जबरदस्तीने दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आले आणि तिथे तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले, असे खुलासे आरोपींनी पोलीस कोठडीत केल्याचे हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले. पोलीस या आरोपींना घटनेचा तपास करण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेले तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ४४ वर घडल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. त्यानंतर सर्व देशभर वादळ निर्माण झाले. सामान्य लोकांनी आणि काही नेत्यांनी याचे स्वागत केले. तर काही मानवधिकार कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी त्याला विरोध केला.