नवी दिल्ली वृत्तसंस्था – मुंबई, दिल्लीसह देशातील १५ शहरांमध्ये ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणा आयबीने व्यक्त केली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील आठवड्यात बकरी ईद ( दि. १२ ) आणि स्वातंत्र्य दिन ( दि. १५ ) असे दोन मोठे सण येत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात या पार्श्वभूमीवर दहशतवादी भारतात मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी तयार राहावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. १२ व १५ ऑगस्ट या दोन दिवशी हल्ला होणार असल्याची सुचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर आता देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करणअयात आला आहे.
काश्मीर, पुर्वोत्तर भारतातील काही शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर सध्या अशांतता आहे. तर या दोन सणांच्या दिवशी देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे.